Sunday, January 18, 2009

मी..


 

नेहमी गोंधळून जाणारा मी, दुसऱ्याला अगदी स्पष्टपणे उपदेश करतो,

पण नक्की कोणासाठी होता तो उपदेश हे कळल्यावर, पुन्हा गोंधळून जातो

 

मुक्या प्राण्याने तडफडून प्राण सोडलेला पाहून, मी मांसाहार कायमचा बंद करायचा ठरवतो,

आणि नंतर समोर जेव्हा नॉनव्हेज डिश येते, तेव्हा मी निसर्गाच्या अन्नसाखळीचं कारण देतो...

 

सेलीब्रेशनचा रंग चढवण्यासाठी घेतलेली जेव्हा उतरते, तेव्हा देशातले गरीब बांधव आठवतात मला,

आणि 'यांच्यासाठी काहीतरी करायलाच हवं' असं वाटून काहीच दिवसात मी पुन्हा 'सेलीब्रेट'  करत असतो

 

दहशतवादाविरोधात आज मला, ‘देशासाठी काय केलं पाहिजे आपण' हा प्रश्न पडतो,

आणि लायसन्स काढताना दिलेले जादा पैसे आठवून, काय करायला नको होतं, याचं उत्तर मिळतं

 

चित्रपट म्हणजे समाजाचाआरसा’ मानणारा मी, आजच्या समाजाची कीव करतो खरी,

पण आपणही कधी असेच वागल्याचे आठवल्यावर, स्वत:ला आरशातही पाहवत नाही...

 

माझ्या चूकांकडे डोळेझाक करणाऱ्या मला, दुसऱ्याच्या चूका मात्र पटकन दिसतात,

आणि समोरच्याने चूक मान्य केल्यावर, स्वत:च्या सगळ्या चूका कबूल कराव्याश्या वाटतात...

 

असा सगळा विचार केल्यावर आपण किती दयनीय आहोत, याची मग जाणीव होते,

पण दुसऱ्याच दिवशी कोणीतरी कौतुक करतं, आणि मी पुन्हा जग जिंकायचं स्वप्नं पाहू लागतो...

6 comments:

Archie said...

waah waah..:)..keep it up!!

Makarand Mijar said...

ह्या कवितेतून एक सरळ, साधी आणि प्रामाणिक विचारसरणी जाणवते रे.
बराच पारदर्शक आहेस रे. :)

Unknown said...

bharich..........

sahdeV said...

Tu mala ha email taakla hotaas, tevhaachyaach comments parat ithe manadato ahe:
"vichaar avadale! kavita vatat nahiyye matra hi frankly! pan a good post to ur blog if you have one"

Unknown said...

hey...chaan lihilayes..kharach joshi kaku aajachi titkyach javal vataat..she was an inseparable part of our childhood...apan ashakya majja keliye..Gandhar madhe...today we all are so far away from each other..still our hearts are as much connected as they were before! cheers to GANDHAR!

संकेत आपटे said...

कंच्याबी ब्लागाच्या पयल्या लेखावर पर्तिक्रिया द्यायची ही आमची ष्टाईल. झ्याक आहे बगा कविता.