Sunday, June 27, 2010

राखाडी रावण

बालवयात जे आपल्यावर संस्कार होतात त्यात गाणी आणि गोष्टींचा सिंहाचा वाटा असतो! ससा-कासवाच्या ‘classic’ गोष्टीपासून ह्या संस्कारांना सुरुवात होते आणि ‘आळस’ हा जो मित्र वाटणारा शत्रू पुढे आयुष्यभर पाठ सोडणार नसतो, त्याची या गोष्टीतून तोंडओळख करून दिली जाते. त्यानंतर ‘चिऊताई चिऊताई दार उघड..’ सारखं timepass गाणं, ‘गाणं’ म्हणजे काय असतं हे सांगायला शिकवतात. नंतर इसापनीतीतल्या ५०-१०० प्राण्यांच्या गोष्टींचा नंबर लागतो. ह्यात प्रत्येक गोष्टीला काहीतरी तात्पर्य असतंच! ह्या गोष्टी सतत काहीतरी शिकवतच असतात! आणि या गोष्टींचा आपल्यावर एवढा भडीमार होतो की नंतर कुठल्या काका किंवा मामाने ‘ये गोष्ट सांगतो’ म्हणून तात्पर्य नसलेली गोष्ट सांगितली, तर उगाचंच आपल्याला वेड्यात काढल्यासारखं वाटतं! ते झालं की टिळकांच्या शेंगांच्या टरफलावाटे पिल्लाच्या चोचीत संस्काराचा दाणा भरावला जातो! आणि मग पाळी येते सगळ्यात लाडक्या, संस्कारक्षम, ‘देव’ या संकल्पनेची ओळख करून देणाऱ्या दोन महान गोष्टींची.. रामायण आणि महाभारत!

रामायण आणि महाभारत ही दोन अफाट गाजलेली महाकाव्ये! आता त्या गोष्टी खऱ्या का खोट्या, राम-कृष्ण, कौरव-पांडव, हनुमान, वानरसेना हे सगळे खरेच होऊन गेले आहेत का, हा भाग जरा बाजूला ठेवूयात. मुख्य मुद्दा हा, की सगळ्यांना रामायण आणि महाभारत भयंकर आवडतं. पण जर असं कोणी विचारलं की तुम्हाला रामायण जास्त आवडतं का महाभारत? तर बहुतेक सगळ्याचं उत्तर ‘महाभारत’ असंच येईल! आणि ह्याला एक कारण आहे...

लहानपणी या दोन्ही गोष्टी एकाच पठडीत सांगितल्या जातात. म्हणजे बघा, रामायणात राम, लक्ष्मण, सीता हे देव असतात आणि रावण हा राक्षस असतो. दुष्ट रावण सीतेला पळवून नेतो आणि मग राम-लक्ष्मण, हनुमान आणि त्याच्या वानरसेनेच्या मदतीने लंकेवर स्वारी करतात. रावणाचा वध करतात. जिंकतात. सत्याचा विजय होतो! किंवा महाभारतात, कौरवांचा पांडवांवर राग असतो. पांडव ५ तर कौरव १०० असतात. पांडव चांगले आणि कौरव वाईट असतात. कृष्ण देव असतो आणि तो चांगलं वागणाऱ्यांची म्हणजे पांडवांची बाजू घेतो. कौरव आणि पांडवांच्यात घनघोर युद्ध होतं. भर युद्धात कृष्ण अर्जुनाला भगवतगीता सांगतो! पांडव जिंकतात. सत्याचा विजय होतो! ह्या अशा ‘हिरो आणि व्हिलन’, ‘देव आणि राक्षस’ स्वरुपात आपण लहानपणी रामायण-महाभारत ऐकतो. मग त्यात हिरोला अजून हिरो करायला अर्जुनाची पक्ष्याच्या डोळ्याची किंवा लक्ष्मण-शूर्पणखेची गोष्ट असते आणि व्हिलनला आणखी व्हिलन करायला जयद्रथ, शकुनी मामा, दु:शासन, बिभीषण अशी पात्रं प्रवेश घेतात.

पण जसे आपण मोठे होतो तशी आपल्याला महाभारतातल्या प्रत्येक मुख्य पात्राची नव्याने ओळख होते. कृष्णाची आणि पांडवांची ‘धुतल्या तांदळाची’ आपल्या मनातली छबी साफ धुवून निघते! चंद्रावरचे डाग दिसतात. आणि प्रत्येक पात्र अतीव सुंदर असा करडा रंग धारण करतो. म्हणजे द्रोणाचार्य एकलव्याला शिकवायचं नाकारून ‘racism’ करतात. नेहेमी खरं बोलणारा युधिष्ठीर ऐन युद्धात ‘नरो वा कुंजरो’ अशी थाप मारून आपल्याच गुरूंना आत्महत्येला भाग पाडतो. द्रोपदी भर सभेत सूतपुत्र म्हणून कर्णाचा उगाचंच अपमान करते. आणि कृष्णाने खेळलेली ‘राजनीती’ तर विचारायलाच नको! कर्णाच्या हाती शस्त्र नसताना तो अर्जुनाला कर्णावर बाण मारायला भडकावतो. ही कुठली नीती? का, तर कृष्णालाही माहिती असतं अर्जुन कर्णाशी कधीच जिंकू शकणार नाही. ‘मृत्युंजय’ आणि ‘राधेय’ वाचल्यानंतर तर मला कृष्णाचा एवढा राग आला होता ना...अशाप्रकारे कृष्णही करडाच होतो..

प्रत्येक जिवंत माणसाला जन्मतःच काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षडरिपु म्हणजे सहा शत्रू आणि सहस्त्र वेगवेगळ्या भावना असतात. कुठलाच माणूस १००% शुद्ध, चांगला किंवा कुठलाच माणूस १००% वाईट असू शकत नाही. म्हणूनच, ही महाभारतातली राखाडी पात्रं आपल्याला जास्त जवळची वाटतात. मनाला पटतात..भिडतात..

पण रामायणाचं असं नाहीये बघा. रामायणाच्या अगदी शेवटी राम सीतेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला अग्निपरीक्षा घ्यायला लावतो, ही गोष्ट सोडल्यास राम नेहेमीच शुद्ध, चांगला असा देव असतो आणि रावण हा नेहेमीच दुष्ट राक्षस असतो.

मध्यंतरी रामायण आणि महाभारतावर २ चित्रपट आले. ‘राजनीती’ ह्या चित्रपटात आधुनिक महाभारत साकारलंय. पण ‘रावण’ या चित्रपटात मणिरत्नमने ‘रामायण’ नव्याने लिहायचं प्रयत्न केलाय...! रामायणात सीता खूप सुंदर असल्याचा उल्लेख आहे. आणि जर रामायणाच्या शेवटी सीता अग्निपरीक्षेत उत्तीर्ण होते, तर एवढा बलशाली रावण हा नक्कीच एक महान व्यक्ती असला पाहिजे. सीतेचे फक्त सौंदर्यच नाही तर अंगभूत गुणांनीही तो चकित झाला असेल, अगदी तिच्या प्रेमातही पडला असेल. मग अशात रावणही रामासारखाच मर्यादापुरुषोत्तम ठरतो! रावणालाही स्वतःची अशी गोष्ट आहे. तो लहानपणी खूप उद्धट आणि चिडका होता. पण म्हणून काही तो outright वाईट ठरत नाही. आणि लक्ष्मणाने शूर्पणखेचं नाक कापल्यानेच चिडून रावणाने सीतेचं अपहरण केलं होतं.

रावणाला दहा तोंडं होती असं त्याचं वर्णन आहे. पण त्यापेक्षा १० पंडितांपेक्षा तो हुशार होता, तो अत्यंत हुशार व्यक्तीपेक्षा १० पट वेगाने विचार करू शकायचा किंवा त्याला ४ वेद आणि ६ उपनिशिदं असं सगळ्याचं ज्ञान होतं हे जास्त पटण्यासारखं आहे. रावण शंकराचा निस्सीम भक्त होता. त्याने सलग कित्येक वर्षे ब्रम्हाची तपश्चर्या केली होती. आणि जर त्याचा वध करायला विष्णूला रामाचा अवतार घ्यायला लागला ह्याचा अर्थ किती सामर्थ्यशाली असेल रावण.. श्रीलंकेत आजही रावणाची मंदिरं आहेत आणि लोकं त्याला देव मानून नियमित दर्शनाला जातात.

ह्या सगळ्या गोष्टी रावणाचा काळा रंग राखाडी बनवतात. रावणाचं हे नवं (आणि कदाचित खरं) रूप मणिरत्नमने पडद्यावर साकारलंय. आणि म्हणूनच चित्रपट कितीही कंटाळवाणा झाला असला, त्याचा first half अगदी बैलगाडीच्या वेगाने पुढे सरकत असला किंवा dialogues अतिशय फुसके असले तरी आता हयात नसलेल्या रावणाच्या मनात जाऊन त्याच्या पात्राचा विचार करून ते पडद्यावर उभ्या करणाऱ्या मणिरत्नमला माझा सलाम!

या नंतर एक विचार मनात येतो की जर राम आणि कृष्ण हे जर विष्णूचे म्हणजे साक्षात देवाचे अवतार असतील तर त्यांनी खऱ्या हिरो कर्णाचे किंवा अगदीच वाईट नसूनही रावणाचे प्राण घेऊन काही चूक केली का..? कदाचित नाही! कदाचित कृष्णाला अर्जुनापेक्षा जास्त कर्णच आवडत होता. पण नियतीमुळे म्हणा, कर्ण कौरवांच्या बाजूने होता आणि कौरवांचं हारणं आणि पांडवांचं जिंकणं हे ‘सामाजिक हिताचं’ होतं. आज कदाचित आपणही पांडवांचेच वंशज असू आणि आपल्यालाही कौरवांपेक्षा पांडवांचेच वंशज होणं आवडलं असतं. तसंच रावणाचा वध करणं हेसुद्धा ‘सामाजिक हिताचं’च होतं. आणि भावनेच्या, स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजाचा फक्त विचारच नाही तर समाजासाठी जो कृती करतो त्याला ‘देवत्व’ प्राप्त झालंय असं म्हणायला हरकत नाही. राम आणि कृष्ण करडया रंगाचे असूनही ह्या देवत्वाने त्यांच्यात एक लकाकी आहे. म्हणूनच त्यांचा करडा रंग स्वर्गीय चंदेरी दिसतो. आणि त्यांचं देवत्व तसूभरही कमी होत नाही..

पण हे काही असलं तरी रावणाचं हे नव्याने समजलेलं राखाडी रूप माझ्या मनाला खूप भावलंय. या राखाडी रावणाला माझे शतश: प्रणाम!

15 comments:

Karan said...

chaan e...

as usual, a different way of luking 2wards a subject...

nice..

Shashwati said...

wah chan.. !! avadlay aplyala..!

Sushant said...

Thank you guys! :)

sahdeV said...

exactly!!! I agree with you for the most part!

I liked Mani Ratnam's take on the epic, not because the way film is put. It has too many showstoppers: songs, ridiculous dialogs at times, illogical story flows, and at times.. sigh! poor direction!!! :-o :((. But I liked his courage to show raavan rather like a hero, and raam bit corrupt.

But also think a little about the para by the end of your post. I disagree a little. How can we judge if what was good for the society. इतिहास हा जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो असं म्हणतात! There is nothing to prove here. Its nothing but the fact! :-| Both of the world-wars, our own independence struggle, Israel-Palestine tensions, cold wars are all good examples,

sahdeV said...

रेफ्रेज करतांना काही व्याकरणाच्या चुका झाल्या आहेत.. त्या नजर अंदाज करणे!
"How can we judge if what was good for the society." is a striking example! x -(

Unknown said...

good one..:)

Sushant said...

@ Aditi- Thank you! :)

@ Vedhas-
तुझं बरोबर आहे. मला पटतंय. एखादी गोष्ट भूतकाळात घडलीच नाही तर त्याचा भविष्यकाळ कसा असेल हे निश्चित सांगता येणार नाही.
पण काय माहिती.. राम आणि कृष्ण visionary असू शकतील. आणि भविष्यात समाजासाठी काय चांगलं हे त्यांना समजलंही असू शकेल..
पण एकंदर तुझा मुद्दा मला पटला..

kunal said...

hmmm....avadalay patalay... aplya manatala watatay...

Dk said...

hmmm raamavarch iraavatee karvyaanche lekh vaach

or mi deto hya weekendla :)

je lihily te aawdly khre pan...

Prachi said...

exactly..even I loved the movie and at the same time I remembered Karna.. he was a hero.

darshan said...

खूप छान लिहिलं आहे.....
पण जे होता ते चांगल्या साठी होता ह्याचा विचार केला जावा....
रावण हा खूप मोठा पंडित होता परंतु त्याने कधीच स्त्रियांचा मान राखला नाही...
स्त्रियांना भारतीय इतिहासात अगदी मनच स्थान आहे. अगदी दुर्गा देवी पासून ते साक्षात जिजाऊ आणि झाशीच राणी लक्ष्मिबाई पर्यंत....
परंतु आज हि जर या लोकांवर कोणी चुकीचा उद्देशून बोलला तर आपण वैतागतो... मग रावणासारख्या पंडिताने जर सीतेचा हरण केले आणि तिला बंदी केल आणि रामाने रावणाचा वध केला तर त्यात चुकीचा ते काय.....?
अन्याय होण महत्वाचा नस्ता त्याची जाणं झाली की माणूस पेटून उठतोच ना....?

darshan said...

खूप छान लिहिलं आहे.....
पण जे होता ते चांगल्या साठी होता ह्याचा विचार केला जावा....
रावण हा खूप मोठा पंडित होता परंतु त्याने कधीच स्त्रियांचा मान राखला नाही...
स्त्रियांना भारतीय इतिहासात अगदी मनच स्थान आहे. अगदी दुर्गा देवी पासून ते साक्षात जिजाऊ आणि झाशीच राणी लक्ष्मिबाई पर्यंत....
परंतु आज हि जर या लोकांवर कोणी चुकीचा उद्देशून बोलला तर आपण वैतागतो... मग रावणासारख्या पंडिताने जर सीतेचा हरण केले आणि तिला बंदी केल आणि रामाने रावणाचा वध केला तर त्यात चुकीचा ते काय.....?
अन्याय होण महत्वाचा नस्ता त्याची जाणं झाली की माणूस पेटून उठतोच ना....?

darshan said...

खूप छान लिहिलं आहे.....
पण जे होता ते चांगल्या साठी होता ह्याचा विचार केला जावा....
रावण हा खूप मोठा पंडित होता परंतु त्याने कधीच स्त्रियांचा मान राखला नाही...
स्त्रियांना भारतीय इतिहासात अगदी मनच स्थान आहे. अगदी दुर्गा देवी पासून ते साक्षात जिजाऊ आणि झाशीच राणी लक्ष्मिबाई पर्यंत....
परंतु आज हि जर या लोकांवर कोणी चुकीचा उद्देशून बोलला तर आपण वैतागतो... मग रावणासारख्या पंडिताने जर सीतेचा हरण केले आणि तिला बंदी केल आणि रामाने रावणाचा वध केला तर त्यात चुकीचा ते काय.....?
अन्याय होण महत्वाचा नस्ता त्याची जाणं झाली की माणूस पेटून उठतोच ना....?

darshan said...

खूप छान लिहिलं आहे.....
पण जे होता ते चांगल्या साठी होता ह्याचा विचार केला जावा....
रावण हा खूप मोठा पंडित होता परंतु त्याने कधीच स्त्रियांचा मान राखला नाही...
स्त्रियांना भारतीय इतिहासात अगदी मनच स्थान आहे. अगदी दुर्गा देवी पासून ते साक्षात जिजाऊ आणि झाशीच राणी लक्ष्मिबाई पर्यंत....
परंतु आज हि जर या लोकांवर कोणी चुकीचा उद्देशून बोलला तर आपण वैतागतो... मग रावणासारख्या पंडिताने जर सीतेचा हरण केले आणि तिला बंदी केल आणि रामाने रावणाचा वध केला तर त्यात चुकीचा ते काय.....?
अन्याय होण महत्वाचा नस्ता त्याची जाणं झाली की माणूस पेटून उठतोच ना....?

Amey Nikharge said...

Ya Deshat Aaj hi Ravanacharyanchi Puja hote. Madhyapradeshat char district madhe tyanchi puja hote. Tyatala Ek Indore madhle Vidhisha district madhe Ravangram navachya gavat tyachi prachin murthi aahe. Ravan Baba Namah Ya navane prarthana kartat. Bidyanath je northla aahe, thithe sudha yanchi murthi dashahara la jalat nahi, Tyanch mhanan aahe ki je shive ji che avadhe mothe bhakt hote, jyana ved nyat hote, Te kase kay ase krutya kartil. I am Agree your thoughts.South la sudha kahi jagi tyana Pujtat. hya tar tya jaga aahe jyancha net var ullekh aahe god knows ajun ashi kevadhi jaga astil jithe Ravanacharyache Bhakt kiva manare astil.